| उरण | वार्ताहर |
केंद्र शासनाने लागू केलेल्या विविध धोरणाचा, निर्णयाचा निषेध करण्यासाठी तसेच ध्येयधोरणे पाठीमागे घ्यावेत यासाठी सीआयटीयू, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व डीवायएफआय या संघटनेच्या माध्यमातून बुधवार, दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. उरण चारफाटा येथे सकाळी 10.30 वा पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत. चारफाटा येथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
वाढलेली प्रचंड महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण, केंद्र सरकारने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंवर लावलेली जीएसटी यांच्याविरोधात संघटित व्हा, असा संदेश देत नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सीआयटीयूचे भूषण पाटील, मधुसूदन म्हात्रे, शशी यादव, संजय ठाकूर, रवींद्र कासूकर, चंद्रकांत कोळी, सतीश खरात, अखिल भारतीय किसान सभेचे रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकूर, परशुराम पाटील, भरत म्हात्रे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे हेमलता पाटील, अमिता ठाकूर, सविता पाटील, उषा म्हात्रे, छाया मढवी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत.