| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
जालगाव येथील दुहिता मंडळातर्फे दरवर्षी श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये दासनवमी उत्सव मोठ्या उत्साहात व अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. माघ वद्य प्रतिपदेपासून या उत्सवाला सुरुवात होते. नवीन पिढीमध्ये तत्त्वज्ञानाची गोडी निर्माण होऊन नवीन प्रवचनकार घडावेत या उद्देशाने जालगाव दुहिता मंडळाच्या माधुरी परांजपे, प्रभा फाटक, प्रतिभा दांडेकर, निलिमा परांजपे, मृणाल जोशी व त्यांच्या सहकारी या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. यंदा (दि.5) मार्च पर्यंत चालणा-या या उत्सवात मनाच्या श्लोकांचे पठण, भक्तीगीत गायन, तसेच दररोज वेगवेगळ्या विषयांवर विविध क्षेत्रांतील तज्ञ निवेदकांची निरुपणे आयोजित करण्यात आली आहेत. यावर्षी चंद्रशेखर अनंत आठवले यांनी संपादित केलेल्या श्री समर्थ अभंग गाथेतील अभंगांचा आधार घेऊन पुढील प्रमाणे निरुपणे सादर करण्यात आली आहेत.