| चिरनेर | प्रतिनिधी |
तालुक्यातील काव्य दरबार उरणतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पोपटी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजित पोपटी काव्य संमेलन चिरले जासई येथे रविवारी (दि.10) मार्च रोजी सकाळी दहा ते पाच या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. या पोपटी कवी संमेलनात तालुक्यातील कवींनी पोपटी कवी संमेलनात आगरी बोलीतील ग्रामीण कवितांवर भर देण्यात येणार आहे. यानिमित्ताने कवी, कथा, कादंबरीकार, गायिका, अध्यापिका, सामाजिक सेविका, आदर्श शिक्षक, कीर्तनकार आणि गुरुवर्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भ. पो. म्हात्रे, म. वा. म्हात्रे, मनस्वी माळी, मीनाश्री मुंबईकर, वंदना घरत, बळीराम पाटील, शिवाजी मोकल, गोविंद घरत, मारुती बागडे, गजानन म्हात्रे या व्यक्तिमत्त्वांचा काव्य दरबार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती इतिहासकार के. एम. मढवी व साहित्यिका मीनल माळी यांनी दिली.