| मुझफ्फरनगर | वृत्तसंस्था |
निवडणुकीपूर्वी शेतकर्यांना दिलेल्या आश्वासनांचा मोदीसरकारला विसर पडल्याने भारतीय किसान युनियनला पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करावे लागेल,असा इशारा राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
सरकारनं गेल्या वर्षी शेतकर्यांना दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळं पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आंदोलनाची तारीख अद्याप ठरलेली नाहीय. मात्र, तयारी पूर्ण झाली असल्याचं टिकैत यांनी सांगितलं.
मोेदी सरकारनं तीन कृषी कायदे मागे घेण्याशिवाय आणखी अनेक आश्वासने दिली. किमान आधारभूत किंमत हमी कायदा, रास्त दरात वीज, सिंचन यांचा त्यात समावेश आहे. मात्र,आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झालं नाही. त्यामुळं पुन्हा आंदोलन करण्याची भूमिका घेतली असून या आंदोलनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. परंतु, आंदोलनाची तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. किसान युनियनचे अध्यक्ष राजवीर सिंह जादौन यांनीही शेतकर्यांना संघटित होण्याचं आवाहन करत पुन्हा एकदा दीर्घ संघर्ष करावा लागणार असल्याचं जाहीर केले.