म्हातवली सरपंचांची मागणी
जेएनपीटी | वार्ताहर |
सतत पडणार्या पावसामुळे फिरवाडी चौपाटी ते उरण चार फाटा या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.त्यामुळे पादचारी,पर्यटक आणि वाहन चालक यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.तरी ओएनजीसी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने गणेशोत्सवापूर्वी सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना चारुदत्त पाटील यांनी ओएनजीसी प्रकल्पाला दिलेल्या निवेदन पत्रकाव्दारे केली आहे.
म्हातवली व नागाव ग्रामपंचायत हद्दीत केंद्र शासनाचा महत्वाचा ओएनजीसी प्रकल्प आहे.या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते,अशा वाहनांच्या वर्दळी मुळे उरण चार फाटा येथून पिरवाडी चौपाटी कडे जाणार्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पुढील महिन्यात ( 10 सप्टेंबर रोजी) गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण येऊ घातला आहे.तरी ओएनजीसी प्रकल्पातील व्यवस्थापनाने उरण चार फाटा येथून फिरवाडी चौपाटी कडे जाणार्या रस्त्यांचे दुरुस्तीचे काम गणेशोत्सवा पुर्वी हाती घ्यावे अशी मागणी रंजना पाटील यांनी केली आहे.