रेवदंडा । वार्ताहर ।
रेवदंडा समुद्र किनारपट्टी तेल तंवग पसरल्याने विद्रुप अवस्थेत असून हे तेल तंवगाने पर्यटकांची नापसंती असून किनारपट्टीवर उदरनिर्वाह करणार्या स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. समुद्रातून वाहून आलेले तेल तवंग कांदळवनास हानिकारक असल्याने कांदळवन नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जाते.
पै. अब्बास भाई तांडेल फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा नईमा सलिम तांडेल यांनी याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंणाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन नाराजी व्यक्त केली आहे. तेल तवंगाने किनारपट्टी विद्रुप झाल्यामुले सध्या येथे पर्यटकांची संख्या फार कमी होत आहे, त्यामुळे विविध व्यवसायावर परिणाम जाणवत असल्याचे म्हटले जाते. तसेच समुद्र किनारपट्टीवर उदरनिर्वाह करणार्या स्थानिकांना सुध्दा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय समुद्रातून येत असलेले तेल तवंग येथील कांदळवनास हानिकारक असून कांदळवन नष्ट होण्याची शक्यता अधिक असल्याचे म्हटले आहे.
समुद्रात असलेली मोठी जहाने खराब ऑईल हे समुद्रात टाकत असल्याने हे तेल तवंग समुद्र किनारी पसरले असल्याचे त्यांनी या निवेदनपत्रात म्हटले असून मोठया जहाजाने खराब ऑईल टाकण्यासाठी समुद्राचा वापर डंपिग ग्राउंड सारखा करत आहेत असा उल्लेख या निवेदनपत्रात केला आहे. याबाबत कार्यवाही व्हावी अशी विनंती या निवेदनात तांडेल यांनी केली आहे.