। कर्जत । प्रतिनिधी ।
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे वाढवित आहेत. ते सर्वांना निश्चित न्याय देतील. कार्यकर्ते संयमशील आहेत. त्याला पण मर्यादा आहेत. मात्र आता अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. कर्जत-खालापूर तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे किरवली येथील साईकृपा शेळके सभागृहात आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खा.श्रीरंग बारणे, पक्षप्रतोद आ.भरत गोगावले, आ. महेंद्र थोरवे, अमर मिसळ, सुषमा ठाकरे, नगराध्यक्षा रोशना मोडवे, संतोष भोईर, मनोहर थोरवे, विजय पाटील, रेखा ठाकरे, उल्हास भुर्के, भाई गायकर, पंकज पाटील, परेश पाटील आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ठाकरे गटासह काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुंकासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही देखील करण्यात आले.
यावेळी काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मराजगे यांनी केले. रमेश मते, दिलीप ताम्हाणे, उत्तम शेळके, हरीश काळे, चंद्रकांत चौधरी, प्रभाकर देशमुख, केतन पोतदार, किसन शिंदे, जान्हवी साळुंके, दीपक भोईर, रामचंद्र मिनमीणे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.