न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका

टीम इंडियात नव्या चेहर्‍यांना संधी
17 नोव्हेंबरपासून मालिकेस प्रारंभ
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
रोहित शर्माच्या नव्या नेतृत्वाखाली येत्या 17 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिका रंगणार आहे. यासाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात पुण्याच्या ऋतुराज गायकवाडसह हर्षल पटेल, व्यंकटेश अय्यर, आवेश खानची निवड झाली. कोहलीसह जडेजा, हार्दिक, शमी, बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय झाला आहे.
नव्या चेहर्‍यांची संघात निवड : यंदा 14 व्या सत्राचे आयपीएल गाजवणार्‍या पुण्याचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडसह व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल आणि आवेशला आता घरच्या मैदानावर होणार्‍या टी-20 मालिकेसाठी संधी मिळाली आहे. या चारही नव्या चेहर्‍यांची आगामी न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. ऋतुराज आयपीएलपाठोपाठ सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धा गाजवत आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्‍विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्‍वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

Exit mobile version