। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्य परिवहन महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करा ही मागणी घेऊन राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या महिनाभरापासून राज्यभरात आंदोलन करता आहेत. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत वेगवेगळ्या घडामोडी घडल्या असून, राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांना पगारवाढ देखील दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याबद्दल आज महत्वाची सुनावणी देखील काहीवेळात पार पडणार आहे. त्यातच आता म्हाडाचे भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केंद्राला पत्र लिहीलं आहे.
राज्य परिवहन महांडळ आर्थिक अडचणींमध्ये असल्याने त्यांचं राज्य शासनात विलीणीकरन करा ही मागणी घेऊन राज्यभरातील एसटी कर्मचारी 26 ऑक्टोबर पासून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करत, सरकारवर दबाव टाकून कर्मचार्यांच्या मागण्या पुर्ण करण्यास सरकारला भाग पाडावं आणि निलंबित कर्मचार्यांना पुन्हा कामावर घ्यायला सांगावं अशी विनंती करणारं पत्र भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लिहीलं आहे.
राज्य सरकारने कर्मचार्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर देखील कर्मचारी हजर न झाल्याने मेस्मा अंतर्गत कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येईल असे इशारा देखील शासनाने कर्मचार्यांना दिला होता. त्यातच आता केंद्र सरकारने जर यामध्ये हस्तक्षेप केला तर हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.