| मुंबई । प्रतिनिधी।
पाकिस्तानसोबत 100 टक्के युद्ध होणार, पाकविरुद्धच्या प्रत्येक युद्धात भाग घेतलेल्या निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी हा दावा केला आहे. मी पाकिस्तान मध्ये झालेल्या प्रत्येक युद्धात भाग घेतलेला आहे. 1965 च्या युद्धात आम्ही लाहोर पर्यंत पोहोचलो होतो. कारगिल युद्धात चीनच्या सीमेवर मी नियंत्रण करत होतो, असे त्यांनी नमूद केले. पूर्ण भारतात उद्या मॉक ड्रिल होईल. युद्धाची परिस्थिती उद्भवलीच तर शत्रू कुठे हल्ला करेल हे सांगता येत नाही, याकरिताच मॉक ड्रिल महत्त्वाचे असते. सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. मुंबईत अणुबॉम्ब केंद्र आहे, व्यापारी केंद्र आहे, विमानतळ आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे पूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वात धोका आहे गुजरातमध्ये देखील तेवढाच धोका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
युद्धाला तोंड फुटलं तर शत्रू कुठे हल्ला करेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. मॉक ड्रिलच्या वेळेस इलेक्ट्रिसिटी, सर्व लाईट बंद होतील. लाईट पूर्णपणे बंद ठेवावे लागतील. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळी फाईव्ह स्टार हॉटेल्स जी आहेत, ती विमानतळाच्या आसपासच असतात, त्यामुळे तिथेही काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला शेकटकर यांनी दिला. सगळ्या लोकांनी मॉक ड्रिलचं पालन इमानदारीने केलं पाहिजे. पाकिस्तान बरोबर युद्ध शंभर टक्के होणार, असा दावा करत आपल्याला अचानक होणार्या हल्ल्यासाठी तयार राहिलं पाहिजे, असेही त्यांनी नमूद केलं.
निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर पुढे असेही म्हणाले की, पाकिस्तानकडे सातशे किलोमीटर ते हजार किलोमीटर रेंजपर्यंतचे मिसाईल आहेत. त्यामुळे शत्रू आपल्यावर कुठेही हल्ला करू शकतो हे आपण गृहीत धरलं पाहिजे. तसेच जिथे जिथे फॅक्टरी, विमानतळ आहेत, त्या ठिकाणी जास्त काळजी घेतली पाहिजे असे ते म्हणाले. लोकांची जबाबदारी काय? लोकांनी काय केलं पाहिजे? लोकांचं कर्तव्य काय? यासाठी मॉक ड्रिल असल्याचंही शेखटकर यांनी स्पष्ट केले.