| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मानी, वायशेत येथील रामधरणेश्वर धरणातील पाण्यात बूडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.5) सकाळी घडली आहे. या घटनेची पोलिसांमार्फत पुढील प्रक्रिया सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहाल विजय शेट्ठी (26) असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण अलिबागमधील मेटपाडा येथील रहिवासी आहे. तो त्यांच्या मित्रमंडळींसमवेत मानी, वायशेत परिसरातील रामधरणेश्वर धरणाजवळ फिरण्यासाठी गेले होते. त्या धरणातील पाण्यामध्ये नेहाल या तरुणाला पोहण्याचा मोह निर्माण झाला. तो पाण्यामध्ये पोहू लागला. मात्र, पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्याला बेशुध्द अवस्थेत अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्याचा अगोदरच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.







