। मुंबई । वार्ताहर ।
मागील दोन वर्षापासून अनेक संकटांना सामोरे जाऊन महावितरणने कोरोना काळातही उत्तम सेवा ग्राहकांना दिली आहे. निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ त्यानंतर महाडमध्ये आलेली पूर परिस्थितीत सुद्धा अहोरात्र काम करून ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. अनेक अधिकारी व कर्मचार्यांनी कोरोना संसर्गातून आपले प्राण गमावले मात्र ग्राहकांना त्रास होऊ दिला नाही. या कठीण काळात सुद्धा सुरळीतपणे वीजपुरवठा करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. तरीही ग्राहकांची भांडूप परिमंडलातील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची वीजबिलाची थकबाकी रु. 381.21 कोटींवर पोहोचली असून ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे.
महावितरण सुद्धा एक ग्राहक असून महावितरणला नियमित वीजखरेदीसह दैनंदिन देखभाल व इतर खर्चासाठी मोठी आर्थिक अडचण येत असते म्हणून नाईलाजाने महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागत आहे. ग्राहकांनी आपले चालू व थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे अन्यथा यापुढे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई अजून तीव्र करण्याचा इशारा भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.सुरेश गणेशकर यांनी दिला आहे. तसेच, शेजार्याकडून अथवा परस्पर वीजचोरी करणार्या ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहेत. असे ही गणेशकर यांनी सांगितले. ग्राहक डीजीटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या आपले वीजबिल ुुु.ारहरवळीलेा.ळप या संकेतस्थळावर किंवा महावितरणच्या मोबाईल एपद्वारे वीजबिल भरू शकतात.