| तळा | वार्ताहर |
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण आयोजित 100 व्या कविसंमेलनाचे औचित्य साधून शनिवारी (दि.17) कवी मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांच्या ‘रोज भेटावी रम्य सकाळ’ या पुरवणी काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, लेखक नरेंद्र पाटील यांच्या आगरी कोळी संस्कृती या कादंबरीचे, तीन एकांकिका आणि नाटक ‘देव गेला दिगंतरा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पनवेल महानगर पालिका विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, प्रा.एल बी पाटील, निलेश म्हात्रे, हसूराम म्हात्रे, दिनेश म्हात्रे, रमेश कीर, नमिता कीर, रमेश थवई, रवि पाटील, राकेश पाटील, रामचंद्र म्हात्रे, अजय शिवकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गावंड यांनी केले.