हैदराबाद | वृत्तसंस्था |
आंध्र प्रदेशला मुसळधार पावसामुळे झोडपून काढले असून,राज्यात आतापर्यंत 17 लोकांचा मृत्यू झालाय. तर 100 लोक बेपत्ता झाले आहेत. बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कडप्पा जिल्ह्यात आतापर्यंत 12 लोक बेपत्ता झाले आहेत. पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरु आहे. वायुदल, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून पुरात अडकलेल्या लोकांना वाचवलं जात आहे.
चेयुरु नदी ओवरफ्लो झाल्याने अन्नामय्या सिंचाई परियोजनेचे पाणी राजमपेट विधानसभा क्षेत्र आणि कडप्पा जिल्ह्यातील अनेक भागात शिरले. आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्टची एक बस रामपूरममध्ये अडकली. अनेक लोकांना वाचवण्यात आले. परंतु, 12 लोकांचा मृत्यू देखील झाला. सात मृतदेह गंडलुरुदवळ, तीन रायवरम जवळ आणि दोन मंडपल्ली जवळ सापडले.