। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पतसंस्थाच्या ठेवींना विमा संरक्षण नाही. पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे ही भुमिका आहे. यासाठी दुसरी विमा कंपनी पतसंस्थासाठी तयार केली पाहिजे. सहकारी संस्थासाठी दुसरी विमा कंपनी निर्माण करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली पाहिजे. त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतिश मराठे यांनी केले.
रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थाचा महासंघ मर्यादीत अलिबाग व सहकारी भारती सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्यादीत कराड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 29 जानेवारी रोजी अलिबागमध्ये पतसंस्था संचालक, अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षण वर्ग व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी सतिश मराठे बोलत होते.
यावेळी सहकार संस्था व महाराष्ट्र राज्य पुणे येथील जॉईंट रजिस्टार टी. एन कवडे, सहकार भारतीचे महासचिव, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सत्कार मुर्ती डॉ. उदय जोशी, अॅड. जे. टी पाटील, दिलीप जोशी, सुरेश पाटील, योगेश मगर, तान्हाजी गव्हाणे, विजय भोईटे, जगदीश कवळे, भागवत देशमुख, अशोक मगर आदी मान्यवरांसह वेगवेगळ्या पत संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतिश मराठे म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणात पतसंस्था झाल्या आहेत. नवीन सभासद, ठेवी अशा वेगवेगळ्या स्तरावर पतसंस्थाची वाढ झालेली आहे. पतसंस्थाची चळवळ खुप मोठी आहे. अनेक कोटींचे ठेवीदार आहेत. बँकाप्रमाणे पतसंस्थाचे नियमीतीकरण करणे आवश्यक आहे. पुढच्या काळात याबाबत भुमिका घेणे गरजेचे आहे. समाजात ठेवीदारांचा विश्वास वाढावा, कामकाज अधिक पारदर्शक व्हावे यासाठी पॅरा को ऑफ बँकची ट्रीटमेंट पतंसंस्था दिली पाहिजे. कोरोनामुळे इकोनॉमी थांबली होती. परंतू काळात इकोनॉमी वाढणार आहे. देशात जीडीपीच्या तुलनेने कर्जाचे प्रमाण फक्त 50 टक्के आहे. हा रेषो वाढला पाहिजे. पुढच्या काळात लहान मोठ्या व्यवसायिकांना कर्ज देणे गरजेचे आहे. लहान उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्याची वेळ आली आहे, असे सतिश मराठे म्हणाले