। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन 5.25 लक्ष वृक्ष वन महोत्सवांतर्गत वृक्षलागवड मोहीम उत्साहात सुरू झाली आहे. कुरुळ येथील दत्त तेकडी येथे जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार सचिन शेजाळ, मीनल दळवी, महसूल व वनविभागाचे इतर अधिकारी-कर्मचारी, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कुरुळचे शिक्षक-विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांनी या वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहिमेत सक्रिय सहभागी होवून निसर्गाचा समतोल राखण्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.