| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
आगरदांडा ते दिघी हे साडेचार किलोमीटरचे अंतर असून लवकरच या भागात एक मोठ्या पुलाची निर्मिती होणार असून रत्नागिरी व रायगड जिल्हा या पुलामुळे जोडला जाणार आहे. सध्या श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथून आगरदांडा पर्यंत जंगल जेट्टीची सुविधा उपलब्ध असून याद्वारे लोकांची ने-आण केली जाते. परंतु, दोन जिल्हे आता कोस्टल हाय वेमुळे जोडले जाणार आहेत. श्रीवर्धन मुरुड तालुक्यातील पर्यटन वाढणार आहे. मुरुंबईहून येणार पर्यटक तळकोकणात लवकर जाऊ शकतो आणि समुद्रकिनारीचे निसर्ग सौंदर्य पाहत जात येणार आहे.
आगरदांडा ते दीघी खाडीपुलासाठी अशोका बिल्डकॉन, टी अँड टी इन्फ्रा तसेच विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या तीन कंपन्यांकडून निविदा सादर झाल्या आहेत. तर, आता लवकरच आर्थिक निविदा खुल्या करत निविदा अंतिम केल्या जाणार असल्याचेही अधिकारी वर्गांनी सांगितले आहे. निविदा अंतिम केल्यानंतर पुढील कार्यवाही पूर्ण करत या दोन्ही खाडीपुलाच्या कामास सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असणार आहे.
आगरदांडा-दिघी पुलाची सर्वांना उत्सुकता असून रत्नागिरी-रायगड जिल्ह्याला जोडला जाणार असून लवकरात लवकर या पुलाच्या प्रक्रियांसाठी पूर्णतः व्हावी, अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.