। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
पावसाळा संपताच तालुक्यातील शेतकरी शेतामध्ये कडधान्य तसेच भाजी पाल्यांची लागवड करत असतात. सध्या ही शेती चांगलीच बहरली आहे. मात्र, या बहरलेल्या शेताला जंगलातल्या रानटी प्राण्यांची मोठ्या प्रमाणात भीती असते. शिवाय पक्ष देखील शेतामध्ये पेरलेल्या कडधान्यांची नासधूस करत असतात. सातत्याने पिकांचे रक्षण करणे हे शेतकर्याला शक्य नसते. त्यामुळे पूर्वी पासून चालत आलेल्या परंपरेनुसार शेताचे संरक्षण करण्यासाठी शेतात बुजागावने उभे ठेवले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कडधान्य पिकांचे नुकसान टळते.
शेतकरी शेतामध्ये वाल, मुग, हरभरे, मटकी, मका त्याचबरोबर भाजी-पाल्याच्या समवेत कडधाने अशी पिके हिवाळ्यात घेत असतो. शेतामध्ये शेतकर्यांनी पेरलेल्या कडधान्याच्या वासाने मोकाट गुरे शेतामध्ये प्रवेश करून पिंकाची नासधूस करतात. त्यामुळे शेतकर्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. भाजी-पाल्याचे नुकसान होऊ नये या उद्देशाने शेतकरी शेतात बुजगावणे उभे करीत आहे. शेताता उभे केलेले बुजगावणने माणसाप्रमाणे दिसत असल्याने शेतात रानटी पक्षी, प्राणी, मोकाट गुरे प्रवेश करीत नाही. त्यामुळे शेतकर्याला या बुजगावण्यापासून मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.