। रसायनी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील समरभूमी म्हणून प्रसिद्ध असणार्या उंबरखिंड येथे, सह्याद्री प्रतिष्ठान, खालापूर विभागाच्यावतीने दीपावली पाडव्याचे औचित्य साधून दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी, सर्वप्रथम विजयस्तंभ व परिसराची स्वच्छता करून स्मारक सभोवताली रांगोळी काढून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. विजयस्तंभ चौथर्यावर पणत्या लावण्यात आल्या. उपस्थित दुर्गसेवकांच्या उत्साहाला उधाण आले असून परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी निनादून गेला.
या कार्यक्रमात सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रितेश तटकरे, समीर घोसाळकर, रमेश शिंदे, रोहिदास ठोंबरे, संदीप जाधव,मंगेश जाधव, संदीप सावंत, समाधान गावंड, जयेश भालेकर, शरद मालकर, अमित पवार, साहिल शिंदे, प्रवीण धूमक, मुकुंद गोनबरे, सुबोध राऊत, तेजस करंजे, अक्षय हेलांडे, निखिल तांबडे, विवेक तांबडे, ओमकार तटकरे, ऋतिक दळवी, रोशन ठोंबरे हे दुर्गसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.