महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
| पनवेल | प्रतिनिधी |
‘स्वच्छ भारत, स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. पनवेल शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. परंतु, सिडको वसाहतीत सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांची म्हणणे आहे.
दरम्यान, सर्वच रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने साचलेल्या या कचऱ्यामुळे डेंग्यू, हिवताप, मलेरिया यांसारख्या साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी, महानगरपालिकेने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.