इंग्लंड श्रीलंकेकडून भारत पराभूत

। कोलंबो । क्रीडा प्रतिनिधी ।

जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेत रंगत भरली जात आहे. यावेळी भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात भारताचे खेळाडू प्रचंड दबावाखाली खेळताना दिसले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 16 षटकात 75 धावा केल्या. तर, प्रती उत्तरादाखल इंग्लंडने जोरदार हल्ला करत 112 धावा करून भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जायला भाग पाडले. या सामन्यात भारताच्या विजय गौडाने 19 धावा तर दैविक रायने 18 धावा व 1 बळी घेत भारताला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली होती. तर इंग्लंडच्या नव पटेल (23 धावा), टॉम क्लार्क ( 16 धावा 1 बळी), ऑलीव ग्रीन (15 धावा 2 बळी) यांनी मोठा विजय मिळवून दिला.

दुसर्‍या साखळी सामन्यातसुध्दा भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला 103 धावात रोखले. तर, भारताने अतिशय अतितटीच्या खेळात 92 धावा करत जोरदार लढत दिली. या सामन्यात धनुष भास्करला (16 धावा 2 बळी) सामनावीर पुरस्कार देऊन गौरविले. विजय गौडा (16 धावा 1 बळी) व अफरोज पाशा (20 धावा) यांनी जोरदार खेळी केली. तर, श्रीलंकेच्या दिलसारा सासंका (16 धावा 1 गुण), चंडीमा आबेयून (17 धावा 1 बळी), विनुदा लियानगे व शेवोन फोनसेका (प्रत्येकी 18 धावा व 1 बळी) यांनी श्रीलंकेला विजय मिळवून दिला.

यावेळी भारत (20.5 गुण) गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर फेकला गेला आहे. तर, श्रीलंका (35.5 गुण) व इंग्लंड (21 गुण) अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या स्थानावर आहेत. इतर सर्व संघाचे साखळी सामने झाले असल्याने त्यांना गुण वाढवण्याची कोणतीही संधी नाही. पहिले दोन संघ अंतिम सामना खेळातील. त्यामुळे या स्पर्धेत भारताला अजून एक सामना सिंगापूर विरुध्द खेळायचा असल्याने भारत अंतिम सामन्यात खेळताना दिसेल.

Exit mobile version