। महाड । प्रतिनिधी ।
राज्य शासनाकडून वृक्ष लागवड,संवर्धनाचे सर्व बाजुने प्रयत्न केले जात असताना महाड तालुक्यांत मात्र गेल्या अनेक दिवसा पासुन बेकायदेशीर खैर जातीच्या झाडांची तोड मोठ्या प्रमाणांत केली जात असुन विना परवाना वाहातुक देखिल करण्यांत येत असल्याचे आढळून आले आहे.ग्रामिण भागांतुन खैर लाकडाच्या तोडीच्या विरोधांमध्ये येथील वनविभागा कडे वारंवार तक्रार करुनही वन विभागा कडून कारवाई केली जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
वास्तविक वन विभाग खेैर झाडांची होणारी कत्तल या कडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला असुन महाड तालुक्यांत तोडण्यांत आलेला खैर झाडांची तोडलेली झाडे खेड तालुक्यांत पाठविण्यांत येत असल्याची माहिती वन विभागांतील कांही कर्मचार्यांनी आपले नाव न घेण्याच्या अटीवर माहिती दिली. महाड तालुक्यांतील कोल, दासगाव, कोथेरी, कुर्ले, वरंध, किल्ले रायगड परिसर, वाळण, नाते ,तळीये, बारसगाव, शिवथर या परिसरांमध्ये प्रामुख्याने झाडांची कत्तल केली जाते.याच बरोबर खैर झाडांचा काताच्या भट्ट्या आणि रंग उत्पादना मध्ये खैर झाडाचा गाभा वापरला जातो,या मध्ये कात भट्टी लावण्यास शासना कडून जरी परवानगी दिली जात असली तरी तालुक्यांतील दुर्गम भागांत विना परवाना काताच्या भट्ट्या लावल्या जातात.त्याच बरोबर बेकायदेशीर तोड आणि वाहातुक देखिल करण्ंयात येते. बेकायदेशीर लाकडाची वाहातुक प्रामुख्याने रात्रीच्या अंधारात केली जाते.मागिल वर्षी महामार्गा वरुन लाकडाची वाहातुक करण्यांत येत असल्याची माहिती वन विभागा कडे मिळाल्या नंतर या विभागाने कडक कारवाई करण्यास सुरवात केली.त्याचा परिणाम होऊन लाकडाच्या तस्करीवर नियंत्रण देखिल आले होते.असे असले तरी आजही खैरे लाकडाची तस्करी सुरुच असल्याचे आढळून आले आहे. वर्षा नु वर्षे ठेकेदार आणि वाहातुक कंत्राटदार यांच्या संगनमनाने झाडांची तोड दिवस रात्र केली जात असताना वन विभागा कडून जाणिव पुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.