पेण व इतर तालुक्यात लगातार चार- पाच दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.त्यामुळे शेती आणि तलावामध्ये पाणी साठून राहिला आहे. त्यातच रात्रीच्या अतिवृष्टीमूळे पत्रकार संतोष पाटील यांच्या मालकीचा अर्धा एकराचा तलाव फुटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल आहे.एक महिन्यापूर्वीच या तलावामध्ये मत्स्यबीज सोडले होते.रात्री झालेल्या अतिवृष्टीमध्ये तलावाच्या दोन्ही भिंती पडून वाहून गेल्यामूळे मत्स्यबीज देखील त्याबरोबर वाहून गेलेला आहे.त्यामुळे पत्रकार संतोष पाटील यांचा लाखो रुपयांचा नुकसान झाला आहे.