| पनवेल | प्रतिनिधी |
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेना (उद्धव ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघर येथे मोर्चा काढण्यात आला. अतिरेक्यांना पाठबळ देणार्या पाकड्यांचा निषेध करण्यात आला. जनतेच्या मनात असलेला राग, प्रतिशोध घेण्याची भावना आणि पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग व्हायलाच पाहिजे, ही मागणी ठामपणे मांडण्यात आली.
यावेळी युवा सेना महानगर प्रमुख व आयोजक अवचित राऊत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी, कलंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, संतोष गोळे, प्रशांत जांभूळकर, रामचंद्र देवरे, युवासेना तालुका अधिकारी, मनोज कुंभारकर, अजय पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख अनिता डांगरकर, कामोठे शहर प्रमुख संगीता राऊत, खारघर शहर संघटिका संपदा धोंगडे यांच्यासह विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.