मुरुड | वार्ताहर |
भारतीय हवामान विभागाने दि. 9 जून ते 12 जून या कालावधीत रायगड जिल्यामध्ये अतिवृष्टी व वादळीवारा येण्याची दाट शक्यता वर्तवली असल्याने जीवित व वित्त हानी होऊ नये तसेच नागरिकांनी अतिवृष्टी काळात घराबाहेर पडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापना मार्फत जिल्हाधिकारी रायगड यांनी दिलेल्या आदेशानुसार मुरुड बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
मुरुड शहरात ग्रामीण भागातून भाजी घेऊन येणार्या महिलां व रानभाज्या घेऊन येणार्या आदिवासी महिला यांच्यापर्यंत हा संदेश पोचला नव्हता त्यामुळे त्या नेहमीप्रमाणे भाज्या घेऊन मुरुड बाजारपेठेत आल्या परंतु बाजारपेठ बंद असल्याचे लक्षात येताच त्यांची घोर निराशा झाली.तसेच आता या शेतातून काढलेल्या भाजीचे करायचे काय हा प्रश्न त्यांना पडला.पुढील तीन दिवस बाजारपेठ बंद असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
समुद्रकिनारी भरतीच्या वेळी लाटा उसळलेल्या होत्या.त्यामध्ये समुद्र किनारी बांधून ठेवलेल्या एका छोट्या होडीचा दोर लाटांच्या मार्याने तुटला.त्या भरकटत असलेल्या बोटीला मोठ्या शिताफीने कोळी बांधवानी किनारी आणले.तसेच मुरुडमध्ये भातशेतीचे राब नुकतेच वर डोकावू लागले आहेत.अतिवृष्टीमुळे सदरचे राब पाण्याखाली राहून खराब होण्याने चिंता बळीराजाला पडली आहे.