सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
कर्जत । वार्ताहर ।
कर्जत-चौक रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. येथील नागरीकांना सतत अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
कर्जत चौक रस्त्यातील खड्डे पाण्याने भरल्यामुळे रात्री प्रवास करताना हे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे मोटारसायकल खड्ड्यात आपटून मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर आजपर्यत खूप प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे.परंतु अधिकारीवर्ग ह्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने जबाबदारी ओळखून सदरील रस्त्यावरील खड्डे त्वरित भरून नागरिकांच्या जीवाशी चालवलेला खेळ थांबवावा अशी मागणी रामदास शेलार चिटणीस शेकाप उमरोली पंचायत समिती विभाग यांनी केली आहे.