रोहा । उदय कळस |
मागील काही दिवसांपासून घोणसे ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या .त्या अनुषंगाने चौकशी सुद्धा करण्यात आली.या चौकशी दरम्यान दप्तरी कामकाजात त्रुटी व उणीवा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.या मध्ये बौद्धवाडी विहार संरक्षण भिंत बांधकाम दोन ठेकेदार यांना देण्यात आले होते.त्यापैकी विजय लाड हे ग्रामपंचायत सदस्य वैदेही लाड यांचे पती आहेत.ग्रामपंचायत सदस्य व त्यांचा नातेवाईकांना काम घेता येत नाही तरी ते घेण्यात आले.टीसीएल खरेदी करणे याची साठा नोंद, स्त्रोत निहाय किती टीसीएल टाकले याची नोंदवही नाही.
विहीर व टाकी सफाईचे काम अक्षय शाम खेडेकर केंद्रचालक यांना देण्यात आले असून कामाच्या मागणी पत्रकावर सही नाही.सदर कामाचा चेक वटवला असून त्यांचा म्हणन्याप्रमाणे सदर चेक रक्कम सरपंच यांचाकडे जमा केला आहे. परंतु चेक वटवणे, रक्कम काढणे यासाठी अक्षय खेडेकर हे जबाबदार आहेत.त्याच प्रमाणे नियमबाह्य पद्धतीने काम करणे यासाठी सरपंच ग्रामसेवक तसेच सदस्य हे जबाबदार आहेत.तसेच कृषी अवजारे लाभार्थी निवड योजना तयार करण्यात आलेली नाही.तसेच स्थानिक दुकानदार यांचा कडून खरेदी करण्यात आलेली नाही.यामध्ये अनियमितता दिसत आहे. 15%मागासवर्गीय रकमेतून म्हशाची वाडी ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे सार्वजनिक वापरासाठी अरिहांत भांडी स्टोअर यांचे कडून भांडी खरेदी करण्यात आली. परंतु सदर भांड्याचे बिल शशांताराम पवार यांचे नावाने चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेले आहे.इत्यादी सर्व कामात सरपंच व ग्रामसेवक यांनी कर्तव्यात कसुरी केलेली आहे.
आम्ही मागणी केलेल्या ज्या कामात भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी होणे आवश्यक होते परंतु तसे न होता प्रशासनाने एक प्रकारे सरपंच आणी ग्रामसेविका यांना क्लीनचिट देण्याचा प्रकार झाला आहे.
रमण खेडेकर (तक्रारदार – घोणसे)