अव्वल नेमबाजांची मागणी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पॅरिस ऑलिंपिक पात्रता चाचणी स्पर्धांमधील अटी शिथिल करा, अशी मागणी देशातील काही अव्वल नेमबाजांनी केली. त्याद्वारे त्यांना या पात्रता स्पर्धांत सहभागी होता येईल; परंतु राष्ट्रीय रायफल संघटनेने स्पष्ट नकार दिला आहे.
प्रत्येक गटात राष्ट्रीय रँकिंगनुसार केवळ पाचच नेमबाज ऑलिंपिक पात्रता स्पर्धांत सहभागी होऊ शकतात, असा राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचा नियम आहे. पॅरिसमध्ये होणार्या ऑलिंपिकसाठी आता दिल्ली आणि भोपाळमध्ये मिळून चार चाचणी स्पर्धा नियोजित आहेत. यातील पहिल्या दोन स्पर्धा दिल्लीतील कर्निसिंग रेंजवर 18 ते 27 एप्रिल, तर दुसरी स्पर्धा भोपाळमध्ये 10 ते 19 मे दरम्यान होणार आहे.
भारताकडून आतापर्यंत 19 नेमबाजांनी ऑलिंपिक कोटा मिळवलेला आहे; परंतु सध्या त्यांचा फॉर्म हरपलेला आहे, तर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांत त्यांच्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी केलेले नेमबाज ऑलिंपिकमध्ये स्थान मिळवण्यास प्रयत्नशील आहेत.