किसान योजनेसाठी विशेष मोहीम

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर सध्या शेतकरी 15 वा हप्ता कधी जमा होणार याच्या प्रतिक्षेत आहेत. परंतू पात्र लाभाथ्यांचे ई-केवायसी, बँक खाते आधार सलग्न करणे व भुमिअभिलेख नोंदी अदयावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्या आहेत. शासनाच्या सुचनेनुसार लाभार्थ्यांनी गुरुवार दि.5 ऑक्टबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाही त्यांची नावे पीएम किसान योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे रोहा तालुका कृषी अधिकारी तसेच त्यांच्या कार्यालयातून यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

यासाठी तालुका स्तरावर विशेष मोहीम विभागाकडून राबवली जात आहे. तालुक्यातील 9037 शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. 583 लाभार्थीची ई-केवायसी तर 1311 लाभार्थीची आधार सिडिंग प्रलंबित आहे. या संदर्भात गावस्तरावर विभागीय कृषि अधिकारी वर्गांकडून वारंवार आवाहन करूनही केवायसी अपडेट होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे गुरुवार 5 ऑक्टोबर ही केवायसी व आधार अपडेट करण्याची शेवटची मुदत आहे. या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी पीएम किसान योजनेचे केवायसी करण्याचे आवाहन रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी केले आहे.

Exit mobile version