। नवीन पनवेल । वार्ताहर ।
विमानतळाच्या कामासाठी डुंगी नदीचे पात्र वळवल्याने पावसाळ्यात गावात पाणी भरते. त्यामुळे डुंगी गावाच्या पुनर्वसनाची मागणी होत आहे. याच अनुषंगाने पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
डुंगी गावातील गावठाणात 128 घरे आहेत. त्यापैकी गावठाणामधील 57 घरे पात्रतेनुसार, 71 गावठाणाच्या बाहेर आहेत. यातील 46 घरे पात्र आहेत, तर 82 घरे अपात्र आहेत. त्यामुळे मौजे डुंगी गावाचे पुनर्वसन करण्यात अडचणी येत आहेत. याच अनुषंगाने पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळा नाईक, नायब तहसीलदार शेलार, अहिल्या नाईक, निशा पाटील, शिल्पा नाईक, विश्वनाथ पाटील, श्रीधर पाटील, तसेच मंडळ अधिकारी, तलाठी क्षमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.