। पुणे । वृत्तसंस्था ।
पुण्यातील मुंबई-बंगळुरू महामार्गावर टँकरच्या नवले पुलाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत सात ते आठजण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.
रविवारी रात्री पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका कंटेनरच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु याचं धक्कादायक कारण स्पष्ट झालेलं आहे.
या अपघातात दुचाकी, २३ चारचाकी वाहनं, रिक्षा आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. बाह्यवळण मार्गावरुन टँकर मुंबईकडे वेगाने निघाला होता. नवले पुलाजवळ तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकरने वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अग्निशामक दलाच्या जवानांकडून क्रेनच्या साहाय्याने वाहने बाजूला करण्यात आली आहेत. या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या ३५ ते ४० लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
हा अपघात ब्रेक फेल झाल्याने घडल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आता याबाबत स्पष्टता झालेली असून उतारावर गाडी न्यूट्रल करुन चालवल्याने अपघात झाल्याचं समोर आलं आहे. उतारावर इंजिन बंद करुन ड्रायव्हरने गाडी चालवली. त्यामुळे ती कंट्रोल होऊ शकली नाही. ड्रायव्हरच्या या मस्तीमुळे वाहनांचं नुकसान झालंय.