। मुंबई । प्रतिनिधी ।
केंद्र सरकारन बुधवारी क्वारंटाईनसंदर्भात नवी नियमावली जारी केली असून सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या बाधितांसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य सरकारने देखील नियमात काहीसा बदल केला आहे.
काही ठिकाणी 14 दिवस, काही ठिकाणी 10 दिवस, काही ठिकाणी 8 दिवस असे क्वारंटाईन दिवस होते. पण आता सर्वानुमते क्वारंटाईन कालावधी 7 दिवसांचा ठेवण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकारने करोनाबाधित आढळल्यानंतर क्वारंटाईन किंवा विलगीकरणात राहण्याचा कालावधी कमी केल्यानंतर त्या धर्तीवर राज्य सरकारने देखील क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल केला आहे.
क्वारंटाईनच्या कालावधीमध्ये बदल करून तो कमी करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. बुधवारी सकाळी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.