पेण | प्रतिनिधी |
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी पेण तालुक्यात शेकापने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून,वाशी गणातून एकला चलोचा नारा शेकापने दिलेला आहे.त्यामुळे या गणातील विरोधक हतबल झालेले आहेत.
निवडणुकीच्या निमित्ताने वाशी परिसरात माजी आम.धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरूवातील शे का प चिटणीस संजय डंगर यांनी प्रास्ताविक केले.जे.एम.म्हात्रे, सचिन पाटील, हरीशचंद्र पाटील, प्रफुल्ल म्हात्रे, संदेश ठाकूर, प्रशांत थवई, दिलीप पाटील, संभाजी पाटील, सरपंच विवेक म्हात्रे, शैलेश पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरिओम) यांनी आगामी येणार्या निवडणुकी संदर्भात आपले मत मांडले
या बैठकीसाठी अर्थ व बांधकाम सभापती अॅड.निलीमा पाटील, जिल्हा परिषदेच्या मा.सभापती तथा सदस्य डी.बी.पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती परशुराम पाटील, लाल ब्रिगेडचे अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, नगरसेवक शोमेर पेणकर, नगरसेवक संतोष पाटील, आदिंसह मोठया संख्येने वाशी-वडखळ विभागातील कार्यकर्ते हजर होते.
पेण तालुक्यातील वाशी जिल्हा परिषद मतदार संघ म्हणजे काँग्रेसची पकड असलेला मतदार संघ म्हणून ओळखला जात होता. परंतु 2017 च्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकत्यांनी इतिहास घडवून वाशी मतदार संघावर लाल बावटा फडकवला आणि प्रभाकर म्हात्रेंच्या रुपाने या मतदार संघाला एक होतकरू आणि दानशुर व्यक्ती महत्व लाभल्याने अनेक विकास कामे या वाशी विभागात स्व खर्चातून देखील त्यांनी केली.
2017 च्या निवडणुकीमध्ये या मतदार संघात चौरंगी लढत झाली. त्यामध्ये कॉग्रेस शिवसेनेचे अविनाश म्हात्रे, राष्ट्रवादीचे जगन म्हात्रे, भाजपचे संजय जांभळे, तर शे.का.पक्षाकडून राजकारणातील नवखे व्यक्तीमत्व प्रभाकर म्हात्रे उभे होते. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाने एक हाती. सर्व मात्तबरांवर विजय मिळवत आपला वर्चस्व दाखवूुन दिला. विधान सभेला मित्र पक्षाकडून झालेली फसवणूक खारेपाटातील कार्यकर्ते विसरायला तयार नाहीत त्यामुळे तरणखोप येथील बैठकीमध्ये सर्व कार्यकत्यांनी एक मुखी ठराव सहमत केला की, वाशी जिल्हा परिषदेच्या मतदार संघात तरी कुणाशी आघाडी करायची नाही. पक्षाच्या स्व हिंमतीवर आगामी येणारी निवडणूक लढायची कारण आघाडी करून मित्र पक्ष आघाडी धर्म पाळत नाहीत. त्यापेक्षा जे काय होईल ते स्व बळावरच.
पक्षातील कार्यकत्यांचा भावनेचा पुर्ण आदर करून जर कार्यकर्त्ये स्व बलावर लढून निवडणुक लढवून विजय संपादन करत असतील तर मला काहीही हरकत नाही. परंतु स्व बळावर लढत असताना आपण कोठे कमी पडणार नाहीत ना याचा देखील अभ्यास कार्यकत्यांनी करावा.
मा. आमदार धैर्यशील पाटील