तातडीने कठोर पावले उचला; केंद्राची सूचना
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दोन दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने आठ राज्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. केंद्राने स्पष्टपणे या राज्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी दिल्ली, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड या राज्यांना पत्र लिहिले आहे.
केंद्राने मृत्यू टाळण्यासाठी पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर केंद्राने असेही सांगितले की दिल्लीत लागू करण्यात आलेले जीआरएपी मॉडेल देशात लागू करण्याचा विचार केला जात आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये 24 तासांत प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गुरुग्राम, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि अहमदाबादसह इतर शहरेही मागे नाहीत. 24 तासांच्या कालावधीत, मुंबईत बुधवारी कोविडच्या 2,510 रुग्णांची नोंद झाली. जी मागील दिवसाच्या तुलनेत 82 टक्क्यांनी वाढली आहे. दिल्लीत बुधवारी कोरोनाव्हायरसची 923 प्रकरणे नोंदली गेली. ती मंगळवारपेक्षा 86 टक्के अधिक आहे.
केंद्राच हा इशारा अशावेळी आला आहे जेव्हा गुरुवारी 24 तासांत भारतात 13,154 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी भारतातील ओमिक्रॉनची प्रकरणे 961 वर पोहोचली. देशातील साप्ताहिक सकारात्मकता दर 0.76 टक्के आहे. जो 46 दिवसांपासून एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. दैनिक सकारात्मकता दर 1.10 टक्के आहे. जो गेल्या 87 दिवसांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.
गुरुग्राम, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि अहमदाबादसह इतर शहरेही मागे नाहीत. 24 तासांच्या कालावधीत, मुंबईत बुधवारी कोविडच्या 2,510 रुग्णांची नोंद झाली. जी मागील दिवसाच्या तुलनेत 82 टक्क्यांनी वाढली आहे. दिल्लीत बुधवारी कोरोनाव्हायरसची 923 प्रकरणे नोंदली गेली. ती मंगळवारपेक्षा 86 टक्के अधिक आहे.
मृत्यू टाळण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. दिल्लीत लागू करण्यात आलेले जीआरएपी मॉडेल देशात लागू करण्याचा विचार केला जात आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये 24 तासांत प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
राजेश भूषण,केंद्रीय आरोग्य सचिव
दिल्लीत रुग्ण सर्वाधिक
कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे संसर्गाचा वेग वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील एकूण ओमिक्रॉन संक्रमितांची संख्या 961 वर पोहोचली आहे. यामध्ये 263 रुग्णांसह दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे, तर 252 रुग्णांसह महाराष्ट्र दुसर्या स्थानावर आहे.