पशू-पक्षांचे अस्तित्व धोक्यात
| सुधागड -पाली | वार्ताहर |
पाली सरसगड किल्ल्यावर मोठा वणवा लागला.सततच्या या वणव्यामुळे किल्ल्याचे नुकसान होत आहे. येथील वृक्षराजी व पशुपक्षांचे अधिवास व अन्न जळून खाक झाले आहेत. त्यामुळे हे वणवे रोखण्यासाठी ठोस उपयोजना करण्याची गरज स्थानिक व दुर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. येथील स्थानिक तरुण रोहन राऊत, ज्ञानेश्वर जगताप,संकेत राऊत, ओमकार फाटक, अभिजीत वरंबे, कुणाल राऊत, ऋषीकेश राऊत, विनोद चव्हाण, सुमित राऊत,वन विभागाचे वनरक्षक वणवा विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
वणवा विझवण्यासाठी योग्य उपकरणे नसणे, आगीचे रुद्ररूप, झाडी-झुडपे, कुयली व तीव्र उतार आदी गोष्टींचा अडसर येतो. सरसगडावर मागील अनेक वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन करत आहे. मात्र वनव्यांमुळे ही सर्व झाडे जळाली आहेत. वणव्यांमुळे येथील वृक्षराजी व पशुपक्षी यांच्याबरोबरच ऐतिहासिक ठेवा देखील धोक्यात येत आहे. परिणामी वणवे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावे अशी मागणी होत आहे.