। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील आंबेवाडी नाक्यावर पहिल्याच पावसात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले, असून रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून यातून मार्ग काढतांना प्रवाश्यांची तारांबल उडाली आहे. तर रिक्षा पार्किंगमध्ये पाणीचपाणी झाल्यामुळे रिक्षा कोठे पार्किंग कराव्या असा प्रश्न रिक्षा चालकांपुढे पडला आहे.
आंबेवाडी नाका हा बाजारपेठेचे मध्यस्ती ठिकाण असून या महामार्गावर मुंबई, गोवा, पुणे, रोहा, अलिबाग या चारही मार्गाकडील असंख्य वाहनाची वर्दळ सुरु असते. या ठिकाणी पनवेल ते इंदापूर रस्त्याच्या चौपदरीकरणात रस्ता उंच रस्त्याच्या दोन्ही बाजू खाली असल्यामुळे तसेच गटाराचे नियोजन शुन्य असल्यामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी जागा राहिलेली नाही. पुढे हेच पावसाचे पाणी साचून रस्त्यावर आले असून या रस्त्याला तलावाचे स्वरूप निर्माण झाले असून हे पाणी आजूबाजूच्या टपरीर्यामध्ये घुसले आहे, यातून मार्ग काढतांना वाहन चालकांची दमछाक होत आहे.