| उरण | वार्ताहर |
अटल सेतूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 50 वर्षीय शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी मुंबईत अटल सेतू तयार करण्यात आला आहे. सेतूवर अपघातासह आत्महत्याच्या देखील घटना घडल्या आहेत. वैभव पिंगळे असे 50 वर्षीय शिक्षकाचे नाव आहे.
वैभव पिंगळे आपल्या कारने सकाळी अटल सेतूवरून जात होते. अटल सेतूवरून जात असताना त्यांनी आपली कार थांबवली. कार थांबवल्यानंतर अटल सेतूवरून त्यांनी उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच वैभव यांचा शोध पोलीस घेत आहे. वैभव हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डुस येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी का आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला? याचा तपास पोलीस करीत आहेत. 2024 सालीही असाच एक आत्महत्येचा प्रकार घडला होता. मुंबईवरून नवी मु्ंबईच्या दिशेनं येणार्या रस्त्यावर अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला. त्या 56 वर्षीय महिलेला पोलिसांना यश आलं आहे. मी आत्महत्या करत नव्हते तर, देवांचे फोटो समुद्रात सोडत होते. असं त्या महिलेनं सांगितलं.