| मुंबई । वृत्तसंस्था ।
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आल्यानंतर गडकरी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या असताना दुसरीकडे त्यांनी पुढील निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.
मुंबईतील अंधेरी येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट’च्या दीक्षांत कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले की, मतदार ज्यांना निवडून द्यायच त्यांना निवडून देतात. सामान्यांना चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती हव्या असून, मी कधीच कोणाच्या गळ्यात हार घातला नाही. पुढच्या निवडणुकीत कटआउट, कार्यकर्त्यांना चहापाणी आणि पोस्टरही लावणार नाही असा निश्चय केला आहे. त्यामुळे निवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या नाहीतर नका देऊ. मात्र, त्यानंतरही लोकं मला मत देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.