शेतकर्यांनी सामील व्हा- मोहन गुंड
| बीड | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयावर शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. या बैलगाडी मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन शेकाप नेते मोहन गुंड यांनी केले आहे.
कोरोनाच्या काळात शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाच कर्जमाफी,पीक कर्ज, महागाईने शेतकरी त्रस्त झाला आहे. झोपेचे सोंग घेतलेली शासकीय यत्रंणा, कामचुकार अधिकारी शेतकर्यांची पिळवणूक करत आहेत. शेतकर्यांची ही अडवणूक थांबावी या मागणीसाठी शेकापने मोर्चाचे आयोजन केले आहे.
आंबेजोगाइ कॉमेड अण्णाभाऊ साठे चौक ते बस स्टॅड मार्गे उपविभागीय कार्यालयावर सकाळी 11 वाजता हा बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे,अशी माहिती गुंड यानी दिली. या बैलगाडी मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन शेकापचे मोहन गुंड,अॅड नारायण गोले, अॅड संग्राम तुपे दत्ता प्रभाळे अर्जुन सोनवणे भिमराव कुटे अमोल सावंत सुग्रीव लाखे अशोक रोडे प्रवीण खोडसे लहु सुळुके मंगेश देशमुख आनील कदम राजु शेख राम नवले महेश गायकवाड यांनी केले आहे.