नागरिक त्रस्त
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नगरपालिका कार्यालयाच्या काही मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर पाणीपुरवठा करणारी टाकी आहे. त्याच परिसरात असलेल्या विठ्ठलनगरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने विठ्ठलनगर परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. याकडे नगरपरिषद प्रशासन लक्ष देणार का, अशी चर्चा सध्या विठ्ठल नगर परिसरामध्ये आहे.
शहरात पाणीपुरवठा होणारी टाकी कर्ज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टेकडीवर आहे, याच टेकडीच्या खाली विठ्ठलनगर परिसर आहे. पूर्वी या विभागात पाणी चांगल्या दाबाने येत होते. नगर परिषदेचे पाणी दुसर्या दुसर्या मजल्यावर चढत होते, मात्र गेले काही दिवसापासून पाणी कमी दाबाने येत असल्याने पहिल्या मजला व दुसर्या मजल्यावर पाणी चढत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत विठ्ठल नगर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासन, स्थानिक नगरसेवक आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी लक्ष देणार का? अशी चर्चा विठ्ठल नगर परिसरातील नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसत आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांची समस्या दूर करण्यात यावी, अशी विठ्ठलनगर परिसरातील नागरिकांची मागणी आहे.