। नवी मुंंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा गुरुवारी ( 13 ऑक्टोबर) नवी मुंबईत येणार आहे. सायंकाळी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसैनिकांचा भव्य मोळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार राजन विचारे आणि उपनेत्या सुषमा आंधारे यांच्या तोफा धडणार आहेत.
शिवसेनेचा महाप्रबोधन यात्रा मेळावा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सायंकाळी चार वाजता सुरू होणार आहे. नवी मुंबईतील हजारो शिवसैनिक या मेळाव्यासाठी येणार आहेत. या प्रसंगी प्रमुख वक्त्यांसह ठाणे लोकसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सुधाकर देशमुख, नवी मुंबई संपर्क प्रमुख आप्पा पराडकर आदी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी नवी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी वाशी येथे दिली या प्रसंगी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, प्रकाश पाटील, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपशहरप्रमुख नरेश चाळके, विभागप्रमुख विजय चांदोरकर, उपविभागप्रमुख संदीप पवार आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी सांगितले पद जाऊ द्या, सर्व सैरावैरा धावतील नवी मुंबई शिवसेनेत जे बाहेरून आले होते, ते गद्दारांच्या कळपात गेले आहेत. निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीच्या मागे खंबीरपणे उभा आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे, तोपर्यंतच ते तिकडे आहेत. एकदा पद जाऊ द्या, जे गेलेत ते सर्व सैरावैरा धावताना दिसणार आहेत,
जाणार्याला निमित्त लागते
मिंधे गटात जाणाछया प्रत्येकाला काहीना काही निमित्त लागत आहे. तसेच निमित्त विजय नाहटा यांनी शोधून काढले आहे. पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना ते भेटत नव्हते, असा कांगावा त्यांनी काल केला. त्यात काहीच तथ्य नाही. पक्षप्रमुख भेटले नसते तर त्यांना उपनेतेपद आणि दोन दोन महामंडळे भेटली असती का असा प्रश्न जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी उपस्थित करून मिंधे गटाचे सर्व आरोप खोडून काढले.