तहसिलदारांचे आवाहन
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुका मुंबईच्या जवळ आहे. शेती उत्पादनासाठी बाजारपेठ जवळ आहे. कर्जत तालुक्यातील बर्याचशा भागात उन्हाळी पिके घेण्यासाठी पाणीही उपलब्ध आहे. पण हल्ली युवक शेती करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यांनी यामध्ये लक्ष घातल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जमिनी विकण्यापेक्षा त्यातून विविध पिके कशी घेता येतील. याकडे आपण सर्वांनी पाहिले पाहिजे. आपल्या तालुक्यातून आदिवासी ग्रामस्थ दररोज तुळशी घेऊन दादरच्या फुल बाजारात जातात. त्याच प्रमाणे अन्य पिकेही थेट बाजारात घेऊन जाणे परवडणारे आहे कारण तालुक्याची भौगोलिक परिस्थिती त्या योग्य आहे. असे महत्वपूर्ण प्रतिपादन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी येथे केले.
कर्जत प्रेस क्लबच्या वतीने कृषी दिनाचे औचित्य साधून शेतकर्यांच्या बांधावर जाऊन सन्मान या संकल्पनेतून आदर्श शेतकरी पुरस्काराचे आयोजन वदप येथील श्री मारुती मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते. तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी चिंतामण लोहकरे, प्रदेशिक कृषी केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, जेष्ठ शेतकरी विठ्ठल शिंदे, सल्लागार विजय मांडे उपस्थित होते.
कार्याध्यक्ष श्रीकांत हाबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष अॅड. राहुल देशमुख यांनी प्रास्ताविकात उपक्रमाचा उद्देश सांगितला. त्यानंतर अॅड. अजित पाटील, वदप आणि हेमंत नामदेव कोंडीलकर यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, तुळशीचे रोप देऊन आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पाटील आणि कोंडीलकर यांनी आपल्या मनोगतातून शेतीतील नव नवीन प्रयोग केल्यानंतर चे अनुभव कथन केले. प्रगतशील निलिकेश दळवी यांनी, मतरुणांनी शेती व्यवसायात उतरल्यास विविध प्रयोग करून शेती व्यवसायात आमूलाग्र बदल होऊ शकतो.फ असे स्पष्ट केले.
कृषी अधिकारी शितल शेवाळे आणि चिंतामण लोहकरे यांनी शासकीय योजना सांगून जास्तीत जास्त शेतकर्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच ड्रीम सिडर आणि एस आर टी ची अवजारे वापरा त्यांच्यावर शासनाकडून 50 टक्के अनुदान मिळते. त्याचा लाभ घ्या.फ असे आवाहन केले. डॉ. रविंद्र मर्दाने यांनी, मभात हे आपल्या जेवणातील मुख्य अन्न आहे. प्रादेशिक कृषी केंद्रात विविध भाताच्या जाती विकसित केल्या जतात. त्यांचे पीक घेतल्यास उत्पन्नात निश्चित वाढ होईल. असे सांगितले. सूत्र संचालन विलास श्रीखंडे तर आभार प्रदर्शन भूषण प्रधान यांनी केले.
या प्रसंगी कृषी विस्तार अधिकारी अभिजीत खैरे, देविदास राठोड, प्रगतशील शेतकरी यशवंत गायकवाड, नैनेश दळवी, रमेश चव्हाण, दशरथ मुने, अनिल देशमुख, खंडू शिंदे, भगवान चव्हाण, जगदीश पाटील, कृष्णा चव्हाण, जानू मराडे, परम पाटील, श्रीकांत पोटील, परम पाटील, अजय गायकवाड, मल्हार पवार, ज्ञानेश्वर बागडे, गणेश पवार, गणेश मते, गणेश पुरवंत, समीर एरूणकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.