| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणक्या विरूध्द येथील शार्लोट लेक येथे मनसेच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अधिकारी तसेच अभियंते यांनी माथेरान येथे येवून आश्वाासन दिले नाहीतर आमरण ठिय्या आंदोलन सुरू राहील, असा इशारा माथेरान मनसे शहराध्यक्ष अध्यक्ष संतोष कदम यांनी दिला आहे.
शार्लोट लेकमधील गाळ काढणे आणि साफसफाई करणे यासाठी कदम यांनी कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले होते. मात्र, प्राधिकरणाकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली नव्हती तसेच आपल्या पत्राला काहीही उत्तरही दिले नाही.त्यामुळे कदम यांनी आपले सहकारी कार्यकर्ते रवी कदम,आसिफ शेख ूरपलहूीहर अनेक कार्यकर्ते यांनी शार्लोट लेक येथे सोमवारी सकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले.
दहा ते बारा वर्षांपूर्वी माथेरानमध्ये जीवन प्राधिकरणाच्यावतीने स्थानिक कामगारांच्या श्रमातून तलाव दरवर्षी स्वच्छ करण्यात येत होता. या कामातून कामगारांना रोजगार उपलब्ध होत असे. .सन 2014 साली श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान श्री सदस्य यांच्या श्रमदानातून तलावाची स्वच्छता करण्यात आली होती. त्यानंतर तलाव स्वच्छता झालीच नाही म्हणून पाण्याची पातळी, साठा वर्षानुवर्ष कमी प्रमाणात होत राहिला.याच तलावातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.त्यामुळे त्याची स्वच्छता होणं खूप आवश्यक बाब आहे,असे कदम यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात कदम यांची मुख्याधिकारी सुरेखा भणगे, पोलीस अधिकारी शेखर लव्हे, पोलीस विशेष शाखेचे राजेंद्र मांडे, महसूल विभाग अव्वल कारकून गोरेगावकर यांनी भेट घेतली आणि चर्चा केली. तलाव स्वच्छता विषयी मागणी केली असता काही तांत्रिक अडचणींमुळे त्याला स्वच्छतेचे काम होण्यास विलंब झाला असला तरी हा विषय जीवन प्राधिकरण यांचा असून नगर परिषदेच्यावतीने सहकार्य निश्चित असेल, असे कदम यांना सांगण्यात आले. सहाय्यक पोलीस अधिकारी शेखर लव्हे यांनीही तलाव स्वच्छता विषय विलंब न करता प्राधिकरणाने तातडीने करावा,असे सुचित केले आहे.