। ठाणे । प्रतिनिधी ।
डॉलरच्या तुलनेत रुपया 87 रुपयाची किंमत 87 रुपये 30 पैशांपर्यंत पोहोचली आहे. रुपयाच्या या घसरणीवरून सध्या मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकारला फटकारले आहे. आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जर असाच रूपया पडायला लागला तर देश कर्जबाजारी होईल व एक दिवस आपल्या देशाचा श्रीलंका होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
आव्हाडांनी म्हटले आहे की, 8 जानेवारीला एका डॉलरची किमंत 85 रूपये 87 पैसे होती. तीच 14 जानेवारीला 86 रूपये 88 पैसे झाली आणि आज 5 फेब्रुवारीला तीच किंमत 87 रूपये 30 पैसे आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर रूपया कधीच एवढा पडला नव्हता. एकीकडे 5 ट्रिलियनची इकॉनॉमी आम्ही करू, असे म्हणत लोकांना वेड्यात मोजणार्यांना पडणार्या रूपयाची चिंताच दिसत नाही. पडणार्या रूपयाचा जागतिक अर्थव्यवस्थेत देशाच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो, हे कसे कळत नाही. नरेंद्र मोदी असो अगर सुषमा स्वराज असो; त्यांचे वाक्य मला आजही आठवते, 8220;जब डॉलर की तुलना मे रूपया गिरता है, तब वो रूपया नही, देश की इज्जत गिर जाती है. देश की प्रतिष्ठा मिट्टी में मिल जाती है.8221; त्यांच्याच भाषणातील ही वाक्ये आज त्यांच्यासमोर प्रश्न म्हणून उभी करायला हवीत. जर असाच रूपया पडायला लागला तर देश कर्जबाजारी होईल. वरून दिसायला कितीही सुंदर असले तरी अर्थव्यवस्था आतून पोखरली जाईल अन् अखेरीस एक दिवस भारताचा श्रीलंका होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.