मुंबई | प्रतिनिधी |
जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये ठार झालेले स्त्री- पुरुष हे हुतात्माच नाहीत, असे वक्तव्य करून ब्रिटिशांच्या बाजूने गांधीजी यांनी 6 ऑक्टोबर 1920 रोजी एका सभेमध्ये एक प्रकारे ब्रिटिशांची माफीच मागितली होती, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी माफीनामा म्हणजे खरे काय असेत, त्याचे उदाहरणच देशवासींसमोर ठेवले.
आजतक या वृत्तवाहिनीच्या ङ्गअजेंडा आजतकफ या कार्यक्रमात ङ्गवीर सावरकरफ, या विषयावर रणजित सावरकर बोलत होते. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ विक्रम संपथ आणि इतिहासकार चमन लाल हेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. श्वेता सिंह यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित माफीनाम्यासंबंधात गेल्या अनेक काळापासून चालत आलेल्या बेदरकार टीकेला उत्तर देताना काँग्रेसच्या नेत्याने काय केले होते, त्याचा हा परिपाकच पुराव्यासह त्यांनी सादर केला. रणजित सावरकर यांच्यासह, इतिहासकार चमनलाल,विक्रम संपत यांनीही आपली मते मांडली.