। मुंबई । प्रतिनिधी ।
शनिवारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाकं वाजवत होते. त्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते, संजय राऊत यांनी मोदींना जोरदार टोला लगवला आहे. अर्थसंकल्प समजायला 72 तास लागतात. बाईंनी अर्थसंकल्प वाचला व आम्हाला समजले असे कुणी म्हणतं असेल तर ते मुर्ख आहेत. आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ञ आहेत ज्यांना एवढ्या लगेच अर्थसंकल्प कळला. अर्थसंकल्पाचे भाषण सुरू असताना मोदी जोरजोरात बाकं वाजवत होते, त्यांना काय अर्थसंकल्प कळला? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
या अर्थसंकल्पात महागाई, बेरोजगारी कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहे का? महागाई व बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं कसं भलं होणार. रुपया 87 वर आला आहे. रुपया मजबूत करण्यासाठी काही योजना आहेत का? 12 लाखापर्यंत जो इनकम टॅक्स स्लॅब आहे त्यापलिकडे मध्यमवर्गीयांसाठी किंवा गरिबांसाठी कोणतीही योजना मला दिसत नाही. 12 लाखावरचे इनकम टॅक्स भरण्यासाठी तेवढे इनकम आणावे लागेल ना. एवढे इनकम कुणाकडे आहे? अनेक लोकं कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करतात. उच्च शिक्षित पदवीधर कॉऩ्ट्रॅक्टरवर काम करत आहेत. त्यांचे उत्पन्न थेट कागदावर येत नाही. त्यांच्यातील किती लोकांचे उत्पन्न 12 लाखवाले किती आहेत. याचा खुलासा ज्यांना आपण खडूस म्हणताय त्यांनी करायला हवा, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच, अर्थसंकल्प समजायला किमान 72 तास लागतात. बाईंनी अर्थसंकल्प वाचला व आम्हाला समजलं असं कुणी म्हणतं असेल तर ते मुर्ख आहेत. आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ञ आहेत ज्यांना एवढ्या लगेच अर्थसंकल्प कळला. मोदी जोरजोरात बाकं वाजवत होते, त्यांना काय अर्थसंकल्प कळला? असा टोला संजय राऊत यांनी मोदींना लगावला.