सात पदकांची कमाई, आतापर्यंतची उत्तुंग कामगिरी
| टोकियो | वृत्तसंस्था |
ऑलम्पिकची सुरुवात सिल्वर मेडलने झाली आणि शेवट सोनेरी झाला. हे सुवर्णपदक शेवटच्या दिवशी आणि आपल्या शेवटच्या इव्हेंटमध्ये आल्यामुळे एक प्रकारची पूर्णत्वाची भावना म्हणजेच Sense of Completion देखील ठरला आहे.
दरम्यान, या ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावून भारताचे पदकांचे खाते खोलले. त्यानंतर बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, बजरंग पुनिया आणि हॉकीत पुरुष संघाने कांस्यपदकाला गवसणी घातली. तर, कुस्तीपटू रवीकुमार दहियाचा गोल्डन चान्स हुकल्याने त्याला रौप्यावर समाधान मानावे लागले. तर, बॉक्सर लवलिनानेसुद्धा कांस्यपदक पटकावून भारताची पदकांची झोळी भरण्याचा प्रयत्न केला.
नीरज चोप्राच्या कामगिरीकडे येण्याआधी आदिती अशोकचा उल्लेख तर करावाच लागेल. परवाच गोल्फचे नियम कसे असतात हे समजून घेतल्यामुळे काल ते प्रत्यक्षात बघताना मजा आली आणि सतराव्या होलच्या वेळेस आदितीची बर्डी एकदम थोडक्यात चुकल्यामुळे अखेर याच कारणामुळे ती चौथ्या स्थानावर राहिली. 2016 च्या ऑलम्पिक मध्ये जिम्नॅस्टिकमध्ये दीपा कर्माकरदेखील अशाच उत्तम कामगिरीनंतर थोडक्यात चौथ्या स्थानावर राहिली होती. पण, तिनेदेखील हा प्रकार संपूर्ण देशाला माहिती करून दिला होता. त्याचप्रमाणे आदितीमुळेदेखील असंख्य लोकांची गोल्फसोबत तोंडओळख झाली. हेच तर ऑलिंपिकमधल्या आपल्या खेळाडूंचे खरे यश आहे. कुस्तीपटू बजरंगने ब्राँझ मिळवत कामगिरी उंचावली. बजरंगकडून खरं तर सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण असो. पहिल्या ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मिळवले म्हटल्यावर पुढे चालून कामगिरी उंचावण्याची नक्कीच संधी आहे.
सुवर्णयशाची भालाफेक करणारा नीरज चोप्रा हे नाव आता सगळ्यांना माहीत झाल्याने तो कुठून आला, त्याचा संघर्ष कसा आहे हे अनेक ठिकाणी वाचायला मिळेलच. फायनलमध्ये खेळताना त्याच्या चेहर्यावर कुठल्याही प्रकारचं दडपण जाणवत नव्हतं. आणि, पहिल्या-दुसर्या थ्रोनंतर तर त्याने भाल्याकडे वळूनसुद्धा न बघता प्रेक्षकांना अभिवादन केलं, त्यातच त्याचा आत्मविश्वास दिसून येत होता.
या सोनेरी शेवटामुळे भारताचा ट्रॅक एन फिल्ड म्हणजेच धावण्याचे आणि भाला गोळा हातोडा थाळीफेक इत्यादी प्रकारच्या खेळातील पदकांचा दुष्काळ संपला आणि 1960 ला मिल्खासिंग 1984 ला पी टी उषा आणि 2004 ला अंजू जॉर्ज यांना पदकानं दिलेली हुलकावणी यावेळी आपल्या पदरी आली नाही आणि पोडीयमवर अखेर जण गण वाजलं! 2008 ला अभिनव बिंद्रा वगळता आजवर आपल्याला कधीच वैयक्तिक प्रकारातलं गोल्ड मेडल मिळाल नव्हत. पण, हेच आपल्या कामगिरीचे आजवरचे कटू वास्तव होतं. आता भारतासाठी ऑलम्पिक संपलं आहे. पण, आपण पदकाच्या संखेच्या बाबतीत 2012च्या लंडन ऑलिम्पिकच्या सहा पदकांची संख्या ओलांडून ती सात अशी केली आहे. म्हणून हे आजवरचं आपलं सर्वात यशस्वी ऑलम्पिक म्हणायला हरकत नाही.
नीरज चोप्रा – भालफेक – सुवर्ण
मीराबाई चानू – वेटलिफ्टर – रौप्य
पी.व्ही. सिंधू – बॅडमिंटन – कांस्य
लवलिना – बॉक्सर – कांस्य
पुरुष संघ – हॉकी – कांस्य
बजरंग पुनिया – कुस्ती – कांस्य
रवीकुमार दहिया – कुस्ती – कांस्य