| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून न सावरलेल्या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. नागपूरच्या आरएसएसच्या मुख्यालयावर 2006 मध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा लष्कर-ए-तोयबाचा कंमांडर अबू सैफुल्लाह मारला गेला आहे. अबू सैफुल्लाह याला अज्ञात हल्लेखोरांकडून संपवण्यात आले आहे. अबू सैफुल्लाह नेपाळमध्ये दहशतवाद्यांचे नेटवर्क चालवायचा. भारतात झालेल्या तीन दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात होता.
पाकिस्तानमधील टेरर नेटवर्कला मोठा दणका बसला आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा डेप्युटी कमांडर सैफुल्लाहचा सिंधमध्ये खात्मा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याची हत्या कुणी केली हे अजून कळू शकलेलं नाही. लष्कर-ए-तोयबा आणि अन्य अतिरेकी संघटनांच्या कृत्यांमध्ये तो आर्थिक सहाय्य करायचा. अबू सैफुल्लाहचा भारतातील तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये हात होता. लष्कर-ए- तोयबाच्या या दहशतवाद्याचं नाव अबू सैफुल्लाह उर्फ मोहम्मद सलीम उर्फ राजुल्लाह निजामनी हे होतं. लष्कर-ए-तोयबाच्या नेपाळमधील मॉड्यूलची जबाबदारी तो सांभाळत होता. याचं मुख्य काम लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी कृत्यांना केडर आणि आर्थिक मदत करणं हे होतं. अबू सैफुल्लाह नेपाळमार्गे भारतात दहशतवादी पाठवत असे. 2001 मधील सीआरपीएफ कॅम्प रामपूर दहशतवादी हल्ला 2005 मधील बंगळूरूमधील दहशतवादी हल्ला आणि 2006 मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाजवळ झालेल्या हल्ल्यांचा तो मास्टरमांईड होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते नेपाळमध्ये राहत होता. नोपाळमध्ये तो ओळख बदलून राहायचा, तिथं त्यानं एका स्थानिक महिलेशी विवाह देखील केला होता.