। माणगाव । सलीम शेख ।
माणगावमधील काळ नदी तुडुंब भरली असून कधीही ती धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन माणगाव तालुक्याची उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव – दिघावकर यांनी केले आहे.
माणगावसह तालुक्यात गेली दोन दिवस आभाळ फाटल्यागत मुसळधार पाऊस पडून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.