| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आदर्श नागरी पतसंस्था मर्यादित अलिबागचा नुकताच रौप्य महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांनी मंगळवार (दि. 9) आदर्श पतसंस्था मुख्य कार्यालयात सदिच्छा भेट देत संस्थापक सुरेश पाटील आणि चेअरमन अभिजित पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक अनिल चोपडा, संचालक विलाप तांडेल आदी उपस्थित होते.
यावेळी आदर्श पतसंस्थच्या कार्याचे कौतुक करताना पाटील यांनी पंचवीस वर्षापूर्वी मीनाक्षी पाटील, जयंत पाटील उद्घाटन हस्ते करण्यात आले होते. आज संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरची पतसंस्था म्हणून नावारूपाला आली आहे. ठेवीदारांची विश्वासार्हता त्यांनी कमवलेली आहे. गरीब ग्राहकांचा विमा उतरवून कर्ज घेणार्यांना दिलासा देणारी एकमेव पतसंस्था आहे. पक्ष विरहित काम करून सुरेश पाटील यांनी आदर्श निर्माण केले आहे. विशेष म्हणजे कुठल्याही ठेवीदारांनी एक कोटी पर्यंत पैसे परत मागितले तर ती दोन तासाच्या आत परत देण्याची तयारी दाखवली आहे. सहकारामध्ये जिल्ह्याचा नाव लौकिक वाढवला आहे.